Thursday, June 25, 2009

अरे देवा.........!!!!!!!!!!!




दिनांक 25 june 2009 पराग भाकरे उर्फ नाना ह्याला कॉल वर व्हिसा काउन्सेलिंग देणे चालू होते.
त्याची बरीच मोठी चौकशी झाल्यावर मी "अरे पण तुझी इंटरव्यू डेट कधी आहे"
नाना "30 ला रे"
मी " आलीच की जवळ"
नाना " हो ना देवाचा धावा चालू केला आहे"
मी "अरे तो यूएस व्हिसा आहे तेव्हा जीसस चा जप कर"
फोन संपला थोड्याच वेळात पण ह्या मी मारलेल्या पान्चट विनोदाने माझ्या आस्तिक आणि नास्तिक ह्या विचारांना challenge दिले.आस्तिक म्हणजे नक्की असते तरी काय?? देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती म्हणजे आस्तिक असा अत्यंत सोपा शब्दकोशातला अर्थ ह्या शब्दाचा मिळतो. पण देवावर विश्वास म्हणजे नक्की काय.देवावर विश्वास ठेवणारया अनेक व्यक्ती मी आयुष्यात पहिल्या आहेत ज्या समोर एखादा भिकारी आला तर त्याच्या पोटासाठी दोन रुपयाची मदत पण देऊ करणार नाहीत आणि एखाद्या मंदिरातील मुर्तीच्या जिरणोधारासाठी हजारो रुपयांचे दान करतील.
अनेक ग्रंथ पुस्तके महाभारत रामायण सर्व वाचून झाले सर्व संत महात्म्यांनी एकाच शिकवण दिली आहे. की चराचरात देव आहे. मग तुम्ही समोर आलेल्या याचकातील देवाला नाराज नाही का करत? तुमचा विश्वास नक्की कशावर दगडाच्या निर्जीव मुर्तिवर की प्रत्येक सजीव व्यक्तीत देव आहे ह्याच्यावर? असे Hippocracy वले आयुष्या जगण्यापेक्षा मला नास्तिक म्हणून घ्यायला परवडेल. माझा विश्वास हा दगडातल्या देवावर नाही तर एका अद्न्यात शक्तीवर आहे. नास्तिक लोक देव ह्या आंगल चा साधारणतः विद्यानाच्या बाजूने विचार करतात. तसे म्हणाले तर हिंदू पुराणातून सांगितले गेलेल्या अनेक गोष्टींमधे साइंटिफिक रेफरेन्सस आढळून येतात. राम - रावण वॉर संपल्यावर कुबेराने रामास अयोध्येला त्याच्या पुष्पक विमानातून सोडले होते असे सांगतात. मग हे पुष्पक विमान म्हणजे कुबेरचे प्राइवेट जेट नाही का म्हणता येणार?एलीयेन्स पहिल्याचा पुरावा अनेक लोकांकडे आहे देव ही शक्ति कोणी कधी पहिली आहे का? हे अलीएनसच तर आपले देव नाहीत. ह्यांच्या टेक्नॉलजीस एवढ्या पुढे गेल्या आहेत म्हणजे आपण तरी असा विश्वास ठेवतो तर मग हीच ती अद्न्यात शक्ति असणे आपण नाकारू शकत नाही. तुकारामांचे वैकुंठा गमन म्हणजे alien abduction समजायचे का? ह्या प्रश्नाची उत्तरे ही आपल्या विचारांच्या आणि आकलन शक्तीच्या बाहेरची आहेत.
खरे सांगायचे झाले आहे तर अस्तिक काय आणि नास्तिक काय माणुसकीवर प्रत्येक व्यक्ती विश्वास ठेवते. माणसे वाईट वर विश्वास ठेवू शकतात मग चांगल्यावर का नाही? विश्वा हे duality theorem वर चालते असते असा विश्वास ठेवला तर सैतान आहे तसा देवहि आहेच. तो फक्त बघता आला पाहिजे.

लहानपण देगा देवा



"श्या ...........आपण मोठे का झालो राव" गंधार च्या ह्या मेल मधल्या वाक्याने 20 जून 2009 ला मनातल्या विचारांच्या समुद्रात एक दगड मारला.खरच का झालो आपण मोठे? असा एक गहन प्रश्न मला भेडसावायला लागला. ती लहानपणी केलेली वर्गात केलेली खडूंनी केलेली लढाई, शिक्षकांचा खाल्लेला मार आणि सगळ्यात जास्त म्हणजे मित्रांबरोबर केलेला दंगा सगळे काही कसे परत करावे अशी इच्छा होऊ लागली आणि ह्या मोठेपणाच्या नावाने आम्ही सर्वच चेन मेल सोबती खडे फोडू लागलो. लहानपण म्हणाले की पहिल्यांदा आठवतो तो तिसर्या मजल्यावरचा अभिनव मधला तो वर्ग. शाळेतला प्रत्येक एक सुख आणि दु:खाचा प्रत्येक क्षण डोळयासमोर तरळतो. इयत्ता चौथी मधले ते स्कॉलरशिप्स चे क्लासस आणि शाळा सुटल्यावर क्लास चालू होई पर्यंत खेळलेले पद आणि प्लास्टिक च्या बॉल चे क्रिकेट तर फारच लक्षात ठेवण्यासारखे होते.
तेव्हा पॅड आहे का बॅट ह्याचा विचार ना करता खेळलेया क्रिकेट मधला खरा आनंद आणि आता कंपनी मधे असताना अरे बॅट कशी वाकडी आहे कसे खेळणार असे अश्या व्य्तक केलेल्या भावनानमधली तफावत खूप मोठी आहे. शालेय जीवनमधे काढलेल्या ट्रिपा विशेषता: मुंबई ची ट्रिप आणि त्या ट्रिप मधे सर्वात मिळू मिसळून राहणे आणि आता ट्रिप ला गेल्यावर ग्रूप ग्रूप ने फिरणे....... खरच एवढा बदल कसा काय झाला आपल्यात. मोठे होता होता जबाबदारयांचे, अनेकांच्या अपेक्षान्चे ओझे उचलता उचलता माझ्यातले एक लहान मूल कुठे लपून बसले आहे ह्याचा शोध घेण्याची अत्यंत निकड भासु लागली आहे. आता सर्व मित्र मंडळी मोठे झाली आहेत काही दिवसात सर्वांची लग्न होतील मग काही दिवसांनी एक ह्या देशात दुसरा त्या देशात अशी परिस्थिती होईल महणजे आत्ताची परिस्थिती फारशी वेगळी आहे असे नाही. मग तेच इकडचे तिकडचे ऑनलाइन चॅट हाय कसा आहेस कुठे असतोस एवढे ठरलेले प्रश्न असे चालतच राहील पण एकत्र भेटून केलेली मजा काही परत परत चाखता येणार नाही.मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी दडवलेल्या आठवणी सारख्या चलतचित्रांसारख्या बघुनच समाधान मानावे लागणार आहे. ह्या सर्व चेन मेल मधल्या चर्चेला आणि विचारांना कौस च्या मेल ने वेगळेच वळण मिळाले. गद्रेराजे ह्यांना ह्यैद्राबाद मधल्या रिक्षातून जाताना लहानपणी खेळलेल्या मधले बोट ओळखा ह्या खेळाच्या आठवणीने एवढ्या गर्दीतून रिक्षावला ओळखा असा आधुनिक खेळ सापडला तेव्हा खात्री झाली की आपल्यातले लहानपण अजुन शाबूत आहे. ते कुठेही गेलेले नाही फक्त ते आता बाहेर यायला जरा बुजत आहे. आपण मोठे झालो म्हणजे खोड्या काढू शकत नाही असे कोण म्हणते रिक्षावला ओळखा सारखे खेळ खेळू शकत नाही असे कोण म्हणते. मोठे होण्यात हीच तर खरी गंमत आहे मनात आणले तर तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही करू शकता. लहानपंच्या काही गोष्टींच्या उणीवा भासतात मोठेपणी पण मोठे झाल्याचे अनेक फायदे पण दिसून येतात. मित्रा भेटणार नाहीत दूर दूर जातील असा विचार करायच्या ऐवजी आपल्याला दुसर्या शहरात ओळखीचे हक्काचे घर आहे.असे मानले तर गोष्टी किती सोप्या होतात.
आयुष्य हे असेच आहे आपल्याकडे जे नाही आहे त्याचीच आपल्याला कायम आस असते हे खरे लहानपणी आपल्याला मोठेपण हवे होते आणि आता मोठेपणी लहानपण हेच खरे.