Sunday, June 28, 2009

सांग सांग भोलानाथ............




आजची सकाळ. मंडे मॉर्निंग. आधीच एक तर दोन दिवस सुट्टी असल्यामुळे आळशी असलेली सकाळ. अशातच मी घरून company बस पकडायला धावत पळत निघालो.वर आभाळ भरून आले असले तरीही मी जवळ छत्त्री विन्चेआटेर् काहीच घेतले नाही. मला खात्रीच झाली आहे की पावसाने पण धडे घेतले आहेत भारतीय राज्यकर्त्यांकडून नुसती आशा दाखवतो पुढे काहीच नाही.
असेच पावसाला दूषणे देत देत माझी पावले माझ्या स्टॉप च्या दिशेने पडत होती. तेवढ्यात समोर जे काही आले ते पाहून खरेच त्या अद्न्यात शक्तीने माझ्या मनातले ऐकले का काय असे मला वाटू लागले. माझ्या समोरच साक्षात नंदी बैल उभा येऊन ठाकला होता. एक माणूस त्या नंदबैलाला सजवून गाडी ओढत ओढत माझ्याच दिशेने येताना दिसला. आता खरे तर अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही पण कसे आहे की डॉक्टरांकडून सर्व उपाय करून झाले आणि तरीही काही होत नाही असे जाणवू लागले की गरजू व्यक्ती जसे एखाद्या बुवाकडे जातात तसे माझे झाले आहे. पुणे वेधशाळेवर आणि हवामान खात्यावरचा विश्वास तर लहानपणीच उडाला होता. हे नक्की माहीत होते त्यांनी अंदाज वर्तवला येणार येणार की हमखास नाही येत पाउस आणि ते नाही येणार म्हणाले की हमखास येतोच. दोघांमधे भलतीच खुन्नस आहे. पण यावेळेस पावासाने त्यांच्या दोन्ही अंदाजांना दाद लागू दिली नाही. जणू काही तो रुसूनच बसला आहे. दर वर्षी गणपती ला पुढच्या वर्षी लवकर या म्हणतात तसे आता पावसच सण साजरा करून त्याला लवकर या पुढच्या वर्षी असे म्हणायची गरज आहे.
असो त्यामुळे हे सर्व लक्षात घेता मनाशी महणले जाउ दे कसला विश्वास आणि कसले काय विचारून तर बघू. हिंमत करून गेलो पुढे नन्दिचा शंकर(मालक) म्हणजे शंकर्याने माझ्याकडे लगेच 10 रु ची डिमांड केली. हं.....चला आजचा दिवस दान धर्म करायचा दिसत आहे तर. मी आपला रिसेशन च्या काळात 10 रुपयाची नॉट त्याच्यापुढे केली."विचारू का" मला पुढे काय करायचे काहीच कल्पना नसल्याने मी त्या शंकर्‍याला विचारले. तो "विचारा की" म्हणाला.
मी आपला माणसाला करतात तसा डाइरेक्ट एकाच प्रश्न त्याला केला " पाउस पडणार का"
इथून पुढचा जो काही 10-15 सेकेंड्स चा सस्पेन्स होता तो म्हणजे राम गोपाल वर्माच्या मूवीस पेक्षा नक्कीच खिळवून ठेवणारा होता.
त्या "नंदबैईलाने बुगु बुगु करत मान हलवली. चला मनाला समाधान लाभले. Atleast नंदबैल तरी हो म्हणाला.
मला बस ला उशीर व्हायला लागल्यामुळे मी तडक निघालो खरा पण आता पावसाळा शिव्हया घालत जाण्यापेक्षा पावसातील अनेक गमती आठवत माझा पुढचा प्रवास होऊ लागला. अजूनही मला आशा आहे की होईल त्याची कृपा. येतील ते मेघ दाटून. नद्या आणि पुण्यातले रस्ते मस्त दुथडि भरून वाहतील... बाहेर मस्त पाउस पडेल आणि मी एक कॉफीचा वाफाळलेला कप, भज्यांची प्लेट आणि मित्र ह्यांच्या संगतीत तो एन्जॉय करेन. काही का होईना विश्वास असो वा नसो हा नन्दिबैल माझ्या मनाला एक प्रकारची नवी आशा देऊन गेला....